कोरोना संकट: आत्मनिर्भर भारतमधील एक देश, एक रेशनकार्ड मजुरांना वाचवणार? | सोपी गोष्ट 81

कोरोनाच्या संकटानं संपूर्ण जगाला ग्रासलंय आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जगभरातले देश नवनवीन उपाययोजना आखतायत.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारनं 20 लाख कोटींच्या आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केलीये. या योजनेतील एक प्रमुख तरतूद आहे ती एक देश एक रेशन कार्ड योजना.

पुढच्या तीन महिन्यांत या योजनेअंतर्गत 23 राज्यांतल्या 67 कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे. पण मुळात ही योजना आहे तरी काय?

खरंच कोणीही देशात कुठेही राहात असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे का? मुळात ही योजना व्यवहार्य आहे का? आणि यात नेमके काय अडथळे निर्माण होऊ शकतात? याबद्दल जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पाहूया आजची सोपी गोष्ट एक देश, एक रेशन कार्ड योजनेची.

निर्मिती - श्रीकांत बंगाळे

सादरीकरण - विनायक गायकवाड

एडिटिंग - नीलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)