You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोष्ट दुनियेची, समुद्राची वाढती पातळी अनेक देश जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
जानेवारी 2014. फिजीमधल्या वुनिडोगोलोआ गावासाठी तो एक दुःखाचा दिवस होता. समुद्राच्या वाढत्या पातळीखाली अनेक वर्षं हळूहळू बुडत गेल्यानंतर, अखेर पॅसिफिक महासागरातील हे पहिलं बेट ठरलं, जिथल्या 1,415 रहिवाशांचं दोन किलोमीटर दूर एका उंच भूभागावर पुनर्वसन करण्यात आलं. समुद्राच्या पुरापासून वाचण्यासाठी इथे उंच ठिकाणी घरं बांधण्यात आली होती. पण आठ वर्षांनंतर फिजीमधील परिस्थिती बिकट झाली. फिजी सरकारने आता अशा 42 गावांची यादी तयार केलीय, ज्यांचं पुढच्या पाच-दहा वर्षांत असंच पुनर्वसन करावं लागेल. अशा अनेक गावांना समुद्र एकतर गिळून टाकतोय किंवा त्यांना राहण्यायोग्य सोडत नाहीय. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की, समुद्राची वाढती पातळी अनेक देश जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल का? निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - तिलक राज भाटिया